व्हॉट्सऍप कट्टा   

खरा भक्त

एक श्रीमंत व्यापारी आपल्या जीवनातील अडचणींवर उपाय मिळावा म्हणून दररोज मंदिरात जाऊन महागडी पूजा आणि द्रव्य अर्पण करत असे. त्याला वाटत होते की, ईश्वराला संपत्तीच्या माध्यमातून प्रसन्न करता येईल आणि त्याच्या समस्यांचे निराकरण होईल. मात्र, बराच काळ उलटून गेला तरी त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत.
 
एके दिवशी, मंदिरात त्याने एक साधा गरीब माणूस पाहिला, जो जुनाट कपड्यांमध्ये शांतपणे ईश्वरापुढे हात जोडून उभा होता. तो आनंदाने म्हणत होता, हे प्रभु! तुझे शतशः आभार! तुझ्या कृपेने मी समाधानाने झोपतो, माझ्या आयुष्यात कोणतीही भीती नाही, कसलीच तक्रार नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा राहू दे.
हे ऐकून व्यापारी चकित झाला. तो मनात विचार करू लागला - मी इतक्या मोठ्या अर्पणांनंतरही दुःखी आहे आणि हा गरीब काहीही न देता इतका आनंदी कसा?
 
याचा उलगडा करण्यासाठी तो एका ज्ञानी संतांकडे गेला आणि संपूर्ण कथा सांगितली. संत शांतपणे हसले आणि म्हणाले, सेठजी, तुम्ही ईश्वराला व्यवहाराच्या दृष्टीने पाहत आहात. जसे तुम्ही लोकांना संपत्तीने प्रसन्न करता तसेच देवालाही प्रसन्न करायला पाहत आहात. पण तो गरीब माणूस ईश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. तो काहीही अपेक्षा न ठेवता त्याचे आभार मानतो. खरी भक्ती ही निरपेक्ष प्रेम आणि समाधानात असते. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षेशिवाय ईश्वरावर श्रद्धा ठेवाल, त्यादिवशी तुम्हालाही खरा आनंद आणि शांती लाभेल.
तात्पर्य : ईश्वराची भक्ती स्वार्थविरहित आणि निरपेक्ष असावी, तेव्हाच खरी सुख-शांती प्राप्त होते.
---
आपल्या जुनाट विचारांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे हाच जीवनाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन असतो. बदल हा जीवनाचा आवश्यक भाग आहे आणि तो स्वीकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही. जुन्या रूढी, चुकीच्या समजुती आणि नकारात्मक विचारांना दूर करून, नवे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते आणि जीवन अधिक आशादायी व यशस्वी बनते. त्यामुळे नेहमी बदलांना सामोरे जा, नवे विचार स्वीकारा आणि सकारात्मकतेने जीवन जगा.
---
बायको : तुम्हाला काय वाटतं
मी तुमच्याशी भांडण्यासाठी कारणं शोधते?
नवरा : अरे! नाही! नाही!
तू कारणं शोधतेस असं कोणी सांगितलं?
तू तर मला शोधतेस, कारणं तर तुझ्याकडे लाखो आहेत.
--------------
बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया :
जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस - तिचे बाबा
जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री - तिची आई
जगातील सगळ्यात हुशार स्त्री - ती स्वत:
जगातील सगळ्यात दु:खी नवरा - तिचा भाऊ
जगातील सगळ्यात मोठी शत्रू -  तिची नणंद
जगातील सगळ्यात सुंदर पुरुष - तिचा मुलगा
जगातील सगळ्यात नशीबवान नवरा - तिच्या बहिणीचा नवरा
जगातील सगळ्यात अडाणी स्त्री - तिची सासू
आणि
आणि जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?
आता हेदेखील सांगायला पाहिजे का?...
----
खूप खूप ताकद लागते
आलेले अपयश  पचवायला,
डोळ्यात आलेले पाणी पुसून
ओठांवर हसू खेळवायला
काहीतरी ध्येय लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
शेवटी अपयशाचीच गरज असते
आयुष्यात खंबीर बनायला.
घर छोट असलं तरी चालेल पण मन मोठ असलं पाहिजे...
---
डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असावं.
हदयातून येणारं दु:ख 
कोणीतरी जाणणारं असावं. 
मनातून येणार्‍या आठवणी 
कोणीतरी समजणारं असावं.
जीवनात सुख :दुखात
साथ देणारं एक सुंदर नातं असावं. 
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला 
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही. 
आपल्याला फ़क्त ‘माणसे‘ महत्वाची आहेत.
ती पण तुमच्या सारखी!
--
‘ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय
मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणीत होत नाही.
तसेच... जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय
सुखाचा गारवा कळत नाही. 
-----
रोज सकाळी जर तुम्ही एक ग्लास कारल्याचा, एक ग्लास भोपळ्याचा आणि एक ग्लास तुळशीचा रस घेतल्यास तुमचे फक्त वजनच नाही तर... तुमची जगण्याची इच्छा सुद्धा कमी होईल. 

Related Articles